Tuesday, May 18, 2010

सुभाषित

क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
क्षमा वशीकृतिर्लोके क्षमया किं न साध्यते ॥

      क्षमा दुर्बळांचे बळ आहे, बलवानांचे भूषण आहे. क्षमा वश करणारी आहे. जगात अशी कोणती गोष्ट आहे जी क्षमेने सिध्द होऊ शकत नाही !

संत तुकारामाचे अभंग

सुख पाहतां जवापाडें । दु:ख पर्वताएवढें ॥ १ ॥

धरीं धरीं आठवण । मानीं संतांचे वचन ॥ २ ॥

नेलें रात्रीनें तें अर्ध । बाळपण जराव्याध ॥ ३ ॥

तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥ ४ ॥

      संसारामध्यें सुख जवाप्रमाणें किंचित आहे आणि दु:ख मात्र पर्वताएवढें मोठें आहे १.
      एवढ्याकरितां संतांचे वचन तूं मान व त्याची नेहमीं आठवण ठेव, असें द्विरुक्तीनें सांगतात २.
      अरे, ह्या मृत्युलोकांत मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा शंभर वर्षे आहे. त्यामध्ये रात्रीचे बारा तास निद्रेंत जातात. म्हणजे शंभरांतील पन्नास गेलीं, बाकी राहिलीं पन्नास त्यांत बारा वर्षे बाळपणांत गेली. काही राहिलेली तारुण्याच्या मस्तींत गेलीं व काही रोगांत व बाकी राहिलेली शेवटचीं म्हातारपणात गेलीं ३.
      तुकाराम महाराज म्हणतात, अरे मूर्खा अशा रीतींने हा देह व्यर्थ जाऊन पुन्हां जन्ममृत्युरूपी घाण्याला तू जुंपला जाशील ४.
[६३]
॥ सार्थ श्रीतुकारामाची गाथा ॥

Tuesday, May 11, 2010

हिंदु नृसिंहा



हिंदु नृसिंहा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हे तूंते । वंदना
करि अंत:करण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदूर्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुध्दि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबड्या जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
-          स्वा. सावरकर



वरील गीताची सुंदर कथा १ मे २०१० रोजी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली. ती अशी
      नाशिक येथे शिव जयंतिचा मोठा कार्यक्रम साजरा होणार होता आणि त्या कार्यक्रमाला टिळक उपस्थित राहणार होते. म्हणुन संयोजकांनी स्पर्धा ठेवली. १५ वर्षा खालील मुलापैकी जो कोणी शिवाजी राजांवर सुंदर कविता करेल त्याला टिळकांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. ह्या कार्यक्रमाला विनायक दामोदर सावरकर भगूर हून पायी आले होते. भगूर ते नाशिक जवळ जवळ १५ ते २० मैलाचे अंतर आहे. त्यावेळी सावरकर फ़क्त ११ वर्षाचे होते. नाशिकला त्यांनी ह्या कार्यक्रमात वरील कविता म्हटली आणि त्यांना टिळकांच्या हस्ते पहिले पारितोषिक सुध्दा मिळाले. नंतर टिळकांनी त्यांना जवळ बोलावून विचारले, बाळ तुला पहिले पारितोषिक मिळाले आता खरं सांग हि कविता तुला कोणी लिहून दिली तुझ्या वडिलांनी की काकांनी. त्यावर सावरकर म्हणाले, जर ज्ञानेश्वर महाराज १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहू शकतात तर मी ११ वर्षी साधी कविता नाही का लिहू शकत? टिळक हसले आणि सावरकरांना आर्शीवाद देत म्हटले,बाळ तु खुप मोठा होशील.

Thursday, April 29, 2010

जयोस्तु ते जयोस्तु ते


जयोस्तु ते जयोस्तु ते

जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमह्न्मंगले । शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ धृ. ॥
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति सपंदांची ।
स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची ।
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी ।
स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी ॥ १ ॥
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली ।
स्वतंत्रते भगवती । तूच जी विलसतसे लाली ।
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची ।
स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ॥ २ ॥
मोक्ष, मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रम्ह वदती ।
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें ।
स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होते ॥ ३ ॥
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते ।
तुजसाठिं मरण तें जनन ।
तुजविण जनन तें मरण ।
तुज सकल चराचर शरण ।
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ ४ ॥
हे हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला ।
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला ।
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला ।
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वा त्यजिला ॥ ५ ॥
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला ।
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला ।
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां ।
कां तुवां ढकलुनी दिधली ।
पूर्वीची ममता सरली ।
परक्यांची दासी झाली ।
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ ६ ॥
- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

ने मजसी ने परत मातृभूमीला


ने मजसी ने परत मातृभूमीला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहू
तइं जननी-ह्र्द विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरि तया परत आणिन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं । ही फ़सगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्देचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फ़ुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते जी सरिता । रे
तव्दिरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
नभि या फ़ेन-मिषें हससि निर्दया । कैसा का वचन भंगिसि ऎसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फ़सवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

Tuesday, April 27, 2010

गे माय भू

गे माय भू



गे माय भू तुझे मी फ़ेडीन पांग सारे ।
आणिन आरतीला हे सुर्य, चंद्र, तारे ॥ धृ. ॥

आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा ।
शब्दात सोड माझ्या आता हळुच पान्हा ॥ १ ॥

आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला ।
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला ॥ २ ॥

मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी ।
माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी ॥ ३ ॥

आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी ।
माझी तुझ्या दुधाने गेली भिजुन वाणी ॥ ४ ॥

पसायदान


पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें वांछिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ ४ ॥

चला कल्पतरुंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकी ।
भजि जो आदिपुरूखी । अखंडित ॥ ७ ॥

आणि ग्रंथोपजीविजयें । होआवें जी ।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ॥ ८ ॥

येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

- ज्ञानेश्वर माऊली

Monday, April 26, 2010

प्रार्थना


प्रार्थना


है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो,
अति उच्चत्म जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ।
ना हम रहें अपने लिए, हमको सभी से गर्ज है,
गुरुदेव यह आशिष दें, जो सोचने का फ़र्ज है ॥

हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के,
सच प्रेम के नित नेम के, सध्दर्म के सत्कर्म के ।
हो चींड झुठी राह की, अन्याय की अभिमान की,
सेवा करन दास की, परवाह नहीं हो जान की ॥

छोटे न हों हम बुध्दि से, हो विश्वमय से ईशमय,
हो राममय और कृष्णमय, जगदेवमय जगदीशमय ।
हर इंद्रियों पर ताबा कर, हम वीर हों अतिधीर हों,
उज्वल रहे सर से सदा, निजधर्मरत खंबीर हो ॥

अतिशुध्द हो आचार से, तन-मन हमारा सर्वदा,
अध्यात्म की शक्ति हमें, पल भी नहीं कर दे जुदा ।
इस अमर आत्मा का हमें, हर श्वासभर में गम रहे,
अगर मौत भी आ गयी, सुख-दु:ख हमसे सम रहे ॥